नवी दिल्ली : वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या दौऱ्यात भारत-श्रीलंका यांच्यात तीन कसोटी, पाच वनडे आणि एक टी-२० खेळवली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल आठ वर्षानंतर भारत आणि श्रीलंका एका सिरीजमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार आहेत. 


२६ जुलैला भारत श्रीलंकेविरुद्ध पहिली कसोटी खेळणार आहे. त्यानंतर कोलंबो आणि कँडीच्या मैदानावर दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. 


डम्बुला येथे पहिली वनडे २० ऑगस्टला होणार आहे. त्यानंतर कँडी आणि कोलंबोमध्ये प्रत्येकी दोन वनडे खेळवल्या जातील. 


तर ६ सप्टेंबरला भारत-श्रीलंका यांच्यात एकमेव टी-२० खेळवली जाणार आहे. याआधी २००९मध्ये भारत आणि श्रीलंकाच्या यांच्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये सीरिज खेळवण्यात आली होती. यात भारताने कसोटी मालिका २-०ने, वनडे ३-१ने जिंकली होती तर टी-२०मध्ये १-१ अशी बरोबरी झाली होती. 


२६ जुलै - पहिली कसोटी गॉल
३ ऑगस्ट - दुसरी कसोटी कोलंबो
१२ ऑगस्ट - तिसरी कसोटी कँडी
२० ऑगस्ट - पहिली वनडे डम्बुला
२४ ऑगस्ट - दुसरी वनडे कँडी
२७ ऑगस्ट - तिसरी वनड कँडी
३१ ऑगस्ट - चौथी वनडे कोलंबो
३ सप्टेंबर - पाचवी वनडे कोलंबो
६ सप्टेंबर - एकमेव टी-२० कोलंबो